Thursday, August 20, 2009

याला जीवन ऐसे नांव ...........

याला जीवन ऐसे नांव ...........

टी.व्ही चालू करा, रेडियो लावा अन्यथा वर्तमानपत्र वाचा अगदी ठीक ठिकानिच्या भिंतीवर पहा 'स्वांइन फ्लू' कही केल्या पाठ सोडत नव्हता मागील पूर्ण आठवड़ा सर्वांच्या चर्चेत एकाच विषय 'स्वांइन फ्लू ' .शहरात सर्वत्र स्वांइन फ्लू नामंक राक्षस दहशत माजवत होता .त्याचा आतंक दिवसेंदिवस वाढत होता .या सगळ्यात अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, पक्ष, प्रसिद्दि माध्यमे आणि कही जण वयक्तिक मदत आपापल्या परींन करीत होते .त्यातच राजकीय पक्ष या संधीचा पुरेपुर फायदा करण्यात मागे पडले नाहीत ; तसे स्वांइन फ्लू यांच्या पथ्यावर पडलेला खुप मोठा राक्षस पण असू शकतो .असो !
मी सुद्धा असेच एका स्वयंसेवी संस्थे तर्फे डॉ। नायडू हॉस्पिटल मधे स्वयंसेवक म्हणुन कार्यरत होतो। अगदी चार तासच तिथे होतो। अगदी हॉस्पिटल मधे आत नव्हतो पण बाहेर मदतकेंद्र उभे केले होते तिथे येणार्या रुग्नना, नातेवाइकना किंव्हा नागरीकाना नायडू चा पत्ता सांगणे, चहा देने, बिस्कीट देने यांसारखे मदतकार्य करत होतो. माजे काही सहकार्यांची तेथील रुग्नंच्या नातेवाइकंशी ओळख जाली होती त्यातील एका लहान मुलीचे वडिल पाहून मनात चर्र~र~ जाले. खरेतर त्याना पाहिल्यावर कोणीही सांगेन की हा मानुस फार गरीब असेन; त्यातच त्यांचा हळवा स्वभाव; का याच लोंकावर देव घाला घालित असतो. खरेच तय काकांना पाहून मनात असंख्य प्रश्न उभे राहिले; पण मी काहीच करू शकत नहीं या जाणिवेने शांत राहिलो आणि उगीचच काहीतरी विचार मनात येण्यासाठी प्रयत्न करत राहिलो. त्याच क्षणी असे वाटले की आता लगेचच उठावे आणि या सर्व परिस्थितिशी एकहात करावा. नंतर ते विचार हळउच विरून गेले.
काही वेळाने मी तेथून निघालो व् जवळ च्याच बस थाब्यावर बसची वाट पाहत थाबालो. तिथे दोन स्त्रियांचे अशलील गोष्ठीवर फोनवर बोलने चालू होत ते एकुनच तेथून मी काढता पाय घेतला व घरी चालत जाऊ या विचारने घरी जाण्याच्या मार्गावर चालायला लागलो. अगदी दोन मिनटच्याच अंतरावर पुणे स्टेशन आले. पुणे स्टेशन तसे पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकान. तेथे आल्यावर आजुबाजुचे निरिक्षण केले. सर्व काही अगदी निरखून पाहत होतो. तेथे पोहचल्या बरोबर काही गारूद्यांचा खेल पाह्न्यास मिळाला. हा खेल अगदी फसवा आणि लोकांवर कुसंस्कार करणारा असतो. त्याचे असे आहे की, हा खेल दाखावनारे दोन मनुष्य लोकांचे आपल्या संभाक्षण कोशल्याने लक्ष रोखून ठेवतात त्यातच मधेच प्रेक्षकनमधून एका माणसाला पुढे बोलवतात (खरेतर तो त्यांचाच साथीदार असतो) तो सुद्धा त्यांच्या इतकाच संभाक्षण कोशाल्यत माहिर असतो. तो त्याना काही प्रश्न विचारतो मग ते दोन मनुष्य लिंबामधून आग वैगरे दाखवतात व लोकांकडून पैसे काढतात. त्याना ताबीज नामक कसलासा प्रकार दाखवतात तो विकत घेतल्यावर तुमचे कल्याण होइल असा सन्देश देतात. जो सुसिक्षित वाटत असेल त्याला हट्क्तात व बाकिंच्या कडून हवे तेवढे पैसे घेवून त्यांच्या कानात काहीतरी कुजबुज करतात. असा प्रकार सर्रासपणे पुणे स्टेशनवर पाहायला मिळतो. तो कार्यक्रम पहिल्यानंतर मी पुढे चालू लागलो. दुहेरी रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुस पाहिले तर पदपथ कुठे तरी हरवला आहे असे वाटते. दोन्ही बाजुच्या पद्पथावर अतिक्रमने आहेत. मोबाइल अक्सेसरिस, वृतपत्र विक्रेत, पानाच्या टपरी, चहाची टपरी यांसारख्यानी पदपथ शुसोभित जालेला नजरेस पडला. मद्येच एक दोन तृतीय पंथी त्यांच्या विचित्र हालचाली वरुण आपले लक्ष वेधून घेतात. पुढे गेल्यावर काही होटल्स, वाइसराय, गुडलक यांसारख्या बेकर्या आपल्या दृष्टीस पडतात. काही पान टपर्यांच्या बाहेर काही तरुण धुर सोडत असताना दिसतात. अगदी एटीत त्यांचे तोंडातून धुर सोड़ने चालू असते व त्यांच्या कड़े पाहिले तर 'आमदनी अठानी खर्चा रूपया ' याचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही व किवही येते. पुढे आल्यावर स्टेशन दिसले. तेथे प्रवाशांची गड़बड़ दिसून येते. कोणी रिक्शातुन उतरत आहे, कोणी रिक्शावाल्यंशी टेरिफवरुन भांडत आहे. तेथूनच एकेरी रस्ता सुरु होतो. एक रस्ता ससुनकडे जातो व दूसरा मालधक्याकड़े जातो. रस्ता ओलंडन्यासाठी भुयारी मार्ग केला आहे. पण तिथे ट्रेवल एजेंटचीच गर्दी जास्त दिसते. मुंबई ~मुंबई~नागपुर असे ओरडत ते येणार्या जानार्याला विनाकारण त्रास देत असतात. भुयाराच्या कडेने चालायला लागले की सर्वत्र दुर्गन्ध येत असतो. तय भुयारात कोपर्या कोपर्यावर थूकुन भिंतीला लाल रंग विना शुल्क दिलेला आहे असे वाटते. तेथून बाहेर पडले तर कडेने मिठाइची दुकाने, ट्रेवल्स ची दुकाने नजरेस पडतात आणि पुढे गेल्यावर पीएमपीएल च्या बसेस उभ्या केलेल्या दिसतील. त्यातील किती बसेस वेळेवर सुटतात हे सांगणे फार कठिन. त्याच्याच बाजूला निळ्या, पांढर्य गाड्या तोर्यात उभ्या असतात. त्या गाड्यावर COOL CAB, PUNE MUMBAI PUNE अशी अक्षरे नजरेस पडतात. त्यांचा तिथे सर्रासपणे बाजार मांडलेला दिसतो. पुढे गेल्यावर अतिशय भयानक दृश दृष्टीस पड़ते. तो भाग म्हणजे ससून हॉस्पिटल चा परिसर. तिथे आल्यावर मला नरकात आलो आहे असे वाटते. तिथे एकेरीच वाहतुक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पद्पथावर काही झोपडी दादानी किंव्हा परप्रान्तातिल बाधवानी छानपैकी कपड्यांची दुकाने मांडलेली दृष्टीस पडतात. रस्त्याच्या डावीकडे पद्पथावर चार-पाच ठिकाणी पावलाच्या अंतरावर अश्श्लिल पुस्तके, सीडी विकताना दिसतात. त्यानी बेकायदेशीर विक्री करण्याचा परवाना मिलवलेला आहे असे वाटते. पुढे गेल्यावर वजनकाटा, मोजे विकणारे दृष्टीस पडतात त्यांची आरोली कानात एकच सन्देश देवून जाते की, 'हे करने आम्हाला भागच आहे; यावरच आमचे पोट आहे .' पुढे गेल्यावर एक मानुस अंगप्रदर्शन करत पहुडला आहे. त्याच्या आजुबजुस खरकट अन्न. पानी अस्ताव्यस्त पडल आहे ते पाहून किळस येते व भरतीला आलेल्या लाटा किनार्यावर येवून आदळव्या तसे विचार मनात आपटत राहतात आणि लाटा नंतर विरून जावून त्यामगुन नवी लाट यावी तसे एकमेकांवर ढकलत त्याच्या मागुन येत राहतात.
एकंदरीत हे सर्व पाहिल्यावर या समाजाच, भारतभुमिचे काय होणार? एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्रात एवढी प्रगति चालू आहे आणि दुसरीकडे अत्यंत हलाखीची परिस्तिती. अनेक प्रश्न मनात तयार होतात आणि मनात अचानक एका कवितेची ओळ स्पर्श करून जाते 'याला जीवन ऐसे नाव.........'
अक्षय डाके, पुणे

Friday, June 26, 2009

आषाढी




आषाढी महिना येताच आठवण आली ती पंढरपूर वारीची. लगबगीने तयारी केली. गर्दीतून वाट काढत निघालो. मजल-दरमजल करून थकलो-भागलो; परंतु उत्साहाने पंढरपुरास पोचलो. मोठा टप्पा पार झाला. रांगेमध्ये उभा राहिलो. कधी "श्रीहरी', कधी "विठ्ठल-विठ्ठल', तर कधी "पांडुरंग-पांडुरंग' करत होतो. मध्येच लेकराबाळांची आठवण येत होती. थकल्या भागल्या अवस्थेमध्ये धक्काबुक्की करत धडपडत एकदाचा गाभाऱ्यामध्ये पोचलो. समोर बघितले आणि एकदम दचकलो, घाबरलो! अहो, गाभाऱ्यातील सावळ्या विठुरायाची मूर्तीच दिसेना. नुसताच चौथरा दिसत होता.
वाटलं, भास झाला असेल! डोळे चोळून चोळून बघितले, पण नाही...मूर्तीच नाही! इकडे तिकडे बघितले, विचारले, तेही म्हणाले, "अहो, खरंच मूर्ती गायब झाली काय?' बापरे! आता काय होणार, कसे होणार, कोणाला सांगितले तर खरं वाटेल का? विश्‍वास कोण ठेवणार? काही सुचेना। सैरभैर झालो. हृदयाची गती वाढती. अनिश्‍चित झाली. मन गाभाऱ्याहून हटायला तयार नव्हते. परंतु, गाभारा रिकामाच वाटत होता, भासत होता. इतक्‍यात गाभाऱ्यातून आवाजांच्या लहरींची स्पंदने उमटली...


""आलास बाळा''... आणि परत मंद सुगंधी हास्याच्या लहरी उमटल्या। ""कशी झाली रे वारी? बरा आहेस ना? कुठं दुखलं-खुपलं नाही ना रे?'' मी नुसतीच मान हलवत राहिलो। "हो-हो' - "नाही-नाही' करत राहिलो। तेवढ्यात तीच स्पंदने उमटली। ""अरे बाळा, वाटेत आपला नामा भेटला का रे?''... आणि क्षणार्धात मस्तकात विजा चमकल्या। अरे, आपल्याला कोठे नामा भेटला? अरे बापरे! केवढी चूक झाली. नाम न घेताच मी आलो. मग नामा भेटणार कसा? मी म्हणालो, ""नाही हो देवा, मी नामच घेतले नाही. मग मला नामा कसा भेटेल?''परत आतून हास्यरूपी स्पंदने उमटली. ""अरे, चोखा होता का रे संगतीला?''""अहो देवा, आयुष्यभर कोणताही व्यवहार चोख केलाच नाही. तर चोखा कसा भेटणार?''""अरे, गोरा तरी आला असेल ना?''परत मी मान हलवली, ""नाही हो देवा, जन्मभर काळीच कृत्ये केली, मग गोरा भेटेल कसा?''""मग ज्ञाना तर नक्कीच दिसला, भेटला असेल ना?''""नाही हो देवा, आजपर्यंत अज्ञानाच्या अंधकारातच भटकलो. मला "ज्ञाना' दिसलासुद्धा नाही.''""अरे, सोपाना तर नक्कीच भेटला असेल?''""नाही हो, भक्तिमार्गाची सोपी वाट सोडली. नको त्या वाटा चोखाळल्या. मग देवा सोपाना कसा भेटणार?''""अरे, मग सावता भेटला असेल की?''""नाही...नाही हो देवा, आयते खाणाऱ्या-आळशी-कामचुकार अशा माझ्यासारख्या खादाडाला सावतासारखा कर्मयोगी कसा भेटणार? मी त्याच्याकडे कधी गेलोच नाही हो.''""अरेरे! मग निवृत्तीचे दर्शन, भेट झाली का? का तेही नाही?'' ""नाही हो, माझे-माझे- मी-मी मलाच पाहिजे- अशा हव्यासाच्या पाठी मी लागलेलो. देवा, निवृत्तीची वाट मला सापडलीच नाही. मग निवृत्तीचे दर्शन कधी होणार?''""अरे मग मुक्ताई तरी दिसली का? का अंधारच दिसतोय.''""नाही हो देवा, वासनेच्या फेऱ्यात हा माझा जीव मोह-मायेच्या दुनियेत रमला आहे. त्याला मुक्ताई कशी दिसणार?''""अरे मग जनी भेटली असेल की? संगतीला असेलच की.''""नाही हो देवा. माझ्याच सुखाच्या शोधात मी वास्तवाला-शाश्‍वताला-सेवेला विसरलो. दानधर्म कधी केलाच नाही. माझ्या हातून अन्नदान कधी घडलेच नाही. परोपकाराविषयी मी अनभिज्ञच राहिलो. अशा मज पामराला ही जनाई (लोक) कशी भेटणार देवा? तुम्हीच सांगा देवा.''आतून धीर गंभीर स्पंदने उमटली. ""अरे बाळा, वत्सा, नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जनी-जनाई ही अध्यात्म ज्ञानाने चोखडी अशी माझीच रूपे आहेत बरे. आता अशा तुझ्यासारख्या अज्ञानी जिवाला माझे तेज-माझी प्रखरता कशी बरे सहन होईल? आधी त्यांची सोबत कर. त्यांचा समागम कर. त्यांचे आशीर्वाद घे. मग हे माझे निर्गुण-निराकार, सगुण-साकार, व्यक्त-अव्यक्त सावाळ्या रूपाचे तुला दर्शन होईल, साक्षात्कार होईल. अरे, हे सर्व जाणून घे, म्हणजे तुझी वारी पूर्ण होईल, नाही तर फक्त कष्ट होतील, नुसतेच श्रम होतील.''आणि काय आश्‍चर्य! निराश मनाने पश्‍चात्तापदग्ध झालेला असा मी परत वळणार, तोच गाभाऱ्यातून तेजस्वी प्रकाशाचा किरण माझ्या मनपटलावर पडला. मी त्या तेजामध्ये न्हाऊन निघालो.माझे ज्ञानचक्षू जागे झाले.मी पाहतच राहिलो. अहो, नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जन-जनाई या सर्वांनी फेर धरला होता... कोणाभोवती फेर धरला होता. मी अधीर होऊन बघत होतो. तो आनंद काही वेगळाच होता. संगीत काही वेगळेच होते. अहो त्यांनी ज्याभोवती फेर धरला होता, ते प्रत्यक्ष माझेच स्वरूप होते. मीच सावळा विठू होतो. मीच तो विठ्ठल होतो. मीच नामा-चोखा होतो. मीच सर्व काही झालो होतो. माझ्या नामाचा ध्वनी मीच ऐकत होतो. "जय जय पांडुरंग हरी- जय जय पांडुरंग हरी' आज सर्वार्थाने वारी पूर्ण झाली. माझ्या वारीची सांगता झाली. श्रीहरी- श्रीहरी- श्रीहरी- श्रीहरी बघा बरे,नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जनाई, आणि हो ज्याच्या भेटीकरिता हे सावळे परब्रह्म सगुणात साकार झाले, तो आमचा पुंडलिक का दिसला नाही हो? अहो खरं आहे हे. "मातृदेवो भव-पितृदेवो भव' याचाच विसर या जगताला पडला. त्या जगतामध्ये कसे राहायचे म्हणून तो कोठे तरी निघून गेला. तो परत येईल का? कोठे असेल तो? तो चंद्रभागास्वरूप होऊन गेला.




मदन कुलकर्णी, कसबा पेठ, पुणे.

Wednesday, June 3, 2009



६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणुन साजरा केला जातो। पण या वर्षी हा दिवस ५ जून या तारखेला आला आहे। तिथि नुसार हा दिवस साजरा केला जातो। छत्रपति शिव रायांचा राज्याभिषेक या शुभ तारखेला पार पडला तसेच या दिवसा पासून शिव राज शके हे वर्ष सुरु केले म्हणुन या दिवसाला शिवराज्याभिषेक दिन तसेच हिंदू साम्राज्य दिन म्हणुन संबोधले जाते । या दिवशी रायगडा वर लाखो शिवसैनिक शिवराज्याभिषेक दिन साजरा करायला येतात। आपण पण हिंदू रक्षण करण्यासाठी शिवराज्याभिषेक दिन साजरा करुयात। या दिवशी शिवराया सारखे निर्भय, साहसी, प्रेमळ ,बुद्धिमान होण्याचा संकल्प करुयात। आणि पुन्हा स्वराज्यासाठी शिवराया कड़े साकडे घालुयात । देशात चाललेल्या दहशत वादी कृत्याची आठवण ठेवून शिवरायाने जसे अफज़ल खानला मारले अगदी तसच आपण पण हा दहशत वाद मोडून काढूयात आणि पुन्हा एकदा हिंदुस्तान हिंदू साठीच आहे हे सर्व जगाला सांगूयात । जय शिवराय !!!

निश्चयाचा महामेरु । बहुत जनाशी आधारु ॥

अखंड स्थिती चा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

Sunday, May 17, 2009

AKSHAY DAKE

सप्रेम नमस्कार ,
मी पुणेकर
पुणे तिथे काय उणे
या उक्तिनुसार खरेच पुण्यात कशाचीही कमी नाही ये।
या सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्याला डॉ विजय भाटकर, डॉ बाबासाहेब पुरंदरे , मन्गेश तेंडुलकर या सारख्या दिगज व्यक्तिनी पुण्याचे नाव लोकप्रियतेच्या शिखरावर नेउन ठेवले आहे। यामहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेया पुणे शहरात मी राहत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे।