Thursday, May 11, 2017

दुनिया

दुनिया गोल आहे खरी पण तिचे कोन अनेक
दुनिया साधी आहे खरी पण तिचे चेहरे अनेक
नाती, गोती आणि सारा संसार म्हणजे ही दुनिया
तू तिचा आणि तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..


दुनिया बेरंग वाटते खरी पण तिचे रंग अनेक
दुनिया अबोल वाटते खरी पण तिच्या भाषा अनेक
अपेक्षा आणि स्वप्ने म्हणजे हि दुनिया
तू तिचा आणि तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..


दुनिया संथ वाटते खरी पण तिला वेग अनेक
दुनिया करीब वाटते खरी पण तिचे अंतर अनेक
प्रश्न उत्तराचा खेळ म्हणजे हि दुनिया
तू तिचा आणि तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..


दुनिया आपली वाटते खरी पण इथे मतलबी अनेक
दुनिया सुखी वाटते खरी पण इथे आक्रोश अनेक
सुख दुःखाचा डोंगर म्हणजे हि दुनिया
तू तिचा तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..

- आशुतोष मगदूम

Saturday, December 17, 2016

एक असतो सुरेश आणि एक असतो रमेश..

एक असतो सुरेश आणि एक असतो रमेश

सुरेश नेहमी सर्व समावेशक असल्याचा आव आणतो. भारतात राहून पण इटली, पाकिस्तान देश खूप प्रिय असतात...
सुरेशचे २ मित्र असतात, एक आवडता आणि एक नावडता...
आवडता मित्र कायदा न पाळणारा, हम करे सो कायदा म्हणणारा, संविधान न मानणारा, अस्वच्छ राहणारा, दंगल भडकावणारा असतो..
नावडता मित्र शांत, संयमी, सहिष्णू असतो, समान नागरी कायदा मानणारा असतो... 
आवडता मित्र वेळ पडली तर स्वतःच्या स्वार्था साठी सुरेशला पण खड्ड्यात ढकलू शकतो हे सुरेशला माहिती असत तरी नावडत्या मित्राला खिजवण्यासाठी सुरेश आवडत्या मित्राला गोंजारत असतो..
सुरेश आवडत्या मित्राच्या अनेक चुका पोटात घेतो पण नावडत्या मित्राच्या चुका काढायची आणि त्याला कोपऱ्यात पकडायची संधी नेहमी साधत असतो.. आवडत्या मित्राच्या अनेक गंभीर चुका असतात पण सुरेश त्या बद्दल चकार काढत नसतो.. पण नावडत्या मित्रांनी जरा कुठं खुट्ट केलं तर सुरेश त्याला धारेवर धरत असतो..



रमेश सर्वसमावेशक भूमिका मनातून जगत असतो.. रमेशला सगळे सारखेच.. रमेशला समान नागरी कायदा मान्य असतो, तो संविधान प्रमाणे सगळे व्यवहार करत असतो.. विज्ञानावर विश्वास ठेवून काळा नुसार स्वतःत बदल करत असतो..
रमेशचे पण तेच २ मित्र असतात.. दोन्ही ही आवडते असतात..
रमेश दोन्ही मित्रांना समान न्याय देत असतो..
रमेशला आपल्या मित्रांचा विकास करायचा या बद्दल मनातून खूप तळमळ असते..
सुरेश त्याला खूप अडथळे आणत असतो.. तरी सुद्धा रमेश काही न बोलता आपलं काम करत असतो..
सुरेश खूप हेकेखोर असतो.. सारखी चिडचिड करत असतो..
रमेश आपल्या दोन्ही आवडत्या मित्रांसाठी अनेक चांगल्या योजना घेऊन येतो..
सुरेश प्रत्येक योजनेमध्ये चुका काढतो आणि मित्रांची दिशाभूल करत असतो..

तात्पर्य : सुरेश ढोंगी, हलकट आणि भेंच्योत असतो..

बघू आता पुढं काय होतंय रमेश अडथळे पार पाडून पुढं जातोय कि सुरेश मधेच त्याची विकेट टाकतोय..

Saturday, December 10, 2016

कुतुहूल..

२-३ वर्षापूर्वी एक पुस्तक हातात पडलं.. वाचायला घेतलं एवढं interesting होत कि एका रात्रीत वाचून काढलं.. माणसाचा जन्म उत्क्रांती मधून झाला, कि बायबल/कुराण प्रमाणे देवांनी इव्ह अँड आदाम याना पृथ्वीवर पाठवून त्यातून बाकीचे लोक्स तयार झाले कि बाहेरच्या ग्रहावरून येऊन पृथ्वीवर मानवाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले..
अजून एक विशेष नेहमी वाटत आले आहे कि धार्मिक ग्रंथामध्ये माणसाचा जन्म कसा झाला याचा उहापोह केला आहे.


आता सर्वात जास्त विशेष विष्णू अवताराचे वाटते.. डार्विन नि जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत बहुतेक हिंदू ग्रंथा मधून चोराला असावा.. बघा ना विष्णूचा पहिला अवतार "मत्स्य" अवतार (जलचर) आहे आणि डार्विन पण काय सांगतो समुद्री जीव सर्वप्रथम तयार झाले त्यानंतर हळूहळू जीवांमध्ये उत्क्रांती होऊन माणूस तयार झाला.. मग कासव अवतार (उभयचर), वराह अवतार (स्थळ चर), नरसिंह अवतार (अर्धा पुरुष, अर्धा सिंह), वामन अवतार (उंचीने बारीक मनुष्य), परशुराम (आक्रमक अवतार), राम (पूर्ण पुरुष, शांत, संयमी), कृष्णा (पुरुषोत्तम म्हणजे शांत आणि चालू, संयमी आणि राजकारणी, कूटनीती करणारा) अशी उत्क्रांतीची थेअरी आपल्या धर्मात हजारो वर्षापूर्वी मांडली होती पण डार्विन नि जास्त विस्तृत मांडून त्याच नाव अजरामर झालं..

कृष्णा नंतर बौद्ध अवतार आहे असं म्हणतात पण ते काय खरं वाटत नाही कारण राम शांत, संयमी होता, कृष्णा शांत, चालू, संयमी तसेच कूटनीतिक होता, म्हणजे त्यानंतरच version अपग्रेडेड पाहिजे होत पण तस नसून ते अजूनच शांत, अहिंसावादी झालं.. म्हणजे बहुतेक पुढची version downgrade असतील. आता कल्की पण येणार आहे म्हणत आहेत कलियुगात कल्की येणार आणि तो माणसाचं एकदम अपडेटेड version असणार आहे..



तर हिंदू आणि डार्विनचा सिद्धांत एकदम मिळताजुळता आहे.. आणि कुराण/बायबल मध्ये डायरेक्ट देवांनी एक स्त्री, एक पुरुष पाठवून माणसे तयार झाली असं सांगितलं आहे.. या प्रकारचा सिद्धांत मी जे पुस्तक वाचले होते त्यात मांडला आहे.. माणूस हा मुळात पृथ्वीवरचा प्राणी नाही असा सिद्धांत त्यात आहे.. दुसऱ्या ग्रहावरून कोणी परग्रहवासी आले आणि त्यांनी इथं त्यांची लोकसंख्या वाढवली आणि परत त्यांच्या ग्रहावर गेले.. असे परग्रहवासी कधी कधी पृथ्वीवर येऊन त्यांच्या बांधवाना शिक्षण द्यायचे, कसे जगायचे, कसे वागायचे, काय खायचे याचे शिक्षण द्यायचे.. जे परग्रहावरून यायचे त्यांना पृथ्वीवरचे त्यांचे बांधव देव, गॉड, रब अशा वेगवेगळ्या नावानी हाक मारायचे.. जेव्हा पृथ्वीवरचे लोक स्वतः सगळं शिकू शकतात याची जेव्हा खात्री झाली तेव्हा परग्रहवासी पृथ्वीवर यायचे बंद झाले.. अनेक ठिकाणी केलेल्या उत्क्रांती मधून हे सिद्ध पण झालं आहे कि आजच्या टेकनॉलॉजि ला पण शक्य नाही अशी काही निर्मिती त्यावेळी मानवाने केली आहे.. आणि ते हि खूप कमी वेळात तर हे त्यावेळच्या अडाणी माणसाला शक्य कसं झालं? पिरॅमिड सारखी मोठी मोठी स्मारकं २० वर्षात बांधली ते हि आजच्या architect / engineer ला शक्य नाही अशा फॉरमॅट मध्ये..

काही ठिकाणी देवाची चित्र काढली आहेत, कि ते विमानात बसून यायचे आणि त्यांना डोक्यावर शेंडी असायची वैगरे.. तर ती शेंडी नसून अँटेना असायचा आणि विमान म्हणजे space shuttle असायचे.. तर अशा प्रकारच्या अनेक शक्यता त्या पुस्तकात पडताळून पहिल्या आहेत..




विमानासाठी प्राचीन रन वे सापडले आहेत, न गंजणार लोखंड, मोठी मोठी (१ दगड हजार टन वजनाचा) दगड एकदम मापात सुरेख कातून बनवलेले मंदिरं, स्मारकं, २६ लाख असे दगड एकमेकांवर रचून बनवलेले पिरॅमिड...  सोन, हिरे, चांदी यांची refinement करून त्यापासून बनवलेले कलाकुसरीचे दागिने.. हडप्पा, मोहोंदारो सारखी आधुनिक नगर.. आताच्या कॉम्पुटर ला पण २०-२० आकडी गुणाकार, भागाकार करता येत नाही पण त्यावेळेस च्या माणसांनी ते अचूक करून ठेवले आहेत.. तर हे सर्व कोणामुळे शक्य झालं? आधुनिक माणूस तर आता ६०-७० वर्षापूर्वी तयार झाला.. विमानाचा शोध ९०-१०० वर्षांपुवीचा, संगणक येऊन ४०-५० वर्ष झाली.. मग अशा आधुनिक गोष्टी प्राचीन काळी नसताना सुद्धा मानवाने एवढी मोठी मोठी निर्मिती केली कशी असा प्रश्न आपल्याला पडतो ना?

अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे मांजर जातीत वाघ, बिबट्या, सिंह, चित्ता, मांजर असे प्राणी आहेत.. श्वान जातीत कुत्रा, लांडगा, कोल्हा असे प्राणी आहेत.. अश्व जातीत घोडा, गाढव, झेब्रा, खेचर हे प्राणी आहेत.. सरपटणारे जातीत पाल, मगर, घोरपड, सरडा असे प्राणी आहेत.. वानर जातीत माकड, गोरिला आहेत.. पक्षी जातीत पोपटाच्या बऱ्याच जाती आहेत, कबुतर सारख्या दिसणाऱ्या अनेक जाती आहेत.. आणि हे सगळे प्राणी बुद्धीने, चालण्याने, बोलण्याने अजून तरी माणसाच्या जवळपास पोहचले पण नाहीत.. माणूस हा प्राणी एकटाच वेगळा आहे पृथ्वीवर.. त्यामुळं असं वाटत कि माणूस बाहेर गाव वरून आलेला पाहुणा आहे आणि इथेच येऊन राहीला.. त्यानी इथे आपलं वर्चस्व प्रस्थपित केलं... अशी सगळी गुपित माणूस उलघडून काढेलच.. आपल्या हयातीत उलगडली तर बरच आहे तेवढंच सगळे doubts क्लिअर होतील..

पुस्तकाचं नाव आहे पृथ्वीवर माणूस उपराच..
खालील लिंक वर हे पुस्तक उपलब्ध आहे..
https://docs.google.com/file/d/0B0eSjwJSKnHjSnNtMEVoM1hrbkU/edit?pli=१ 

Wednesday, December 7, 2016

आयुष्य ताट(ठ)..

जीवन खूप गोष्टीनी भरलेलं आहे आणि या अनेक गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत ते आपल्याला कळत नाही.. अशीच एक बसल्या बसल्या बनवलेली गंमतीशीर गोष्ट :-


आपण रोज जेवतो, जेवताना ताटात मेन कोर्स असतो भाजी, चपाती, भात वरण आणि गोड धोड.. तोंडी लावायला असत मीठ, लोणचं, कोशिंबीर, ठेचा इतकं आणि जिभेचे चोचले पुरवणार बरच काही.. स्टार्टर असतो पापड, सूप इत्यादी. मी स्टार्टर; मेन कोर्स असल्या सारखं हादडतो.. आता जेवायचं ताट आणि आयुष्यातली कोणती गोष्ट कुठं कनेक्ट होते याचा मी संबंध लावतोय.. पटलं तर डोक्यावर घ्या आणि नाही पटलं तर हलकेच घ्या..

आपल्या आयुष्यात कुटुंब, काका, मावशी, आत्या, शिक्षक, गुरु तसेच गल्लीतले मित्र, शाळेतले मित्र, क्लास मधले मित्र, कॉलेज चे मित्र, ऑफिस मधले मित्र, शाखेतले मित्र.. या सगळ्यांचा आपल्यावर  प्रभाव असतो.. आयुष्याच्या प्रत्येक phase मध्ये नवीन नवीन लोक्स भेटतात.. काही बरोबर राहतात काही निघून जातात.. काही चांगले असतात काही वाईट असतात.. काही वाईट असून पण हवेहवेसे वाटतात काही चांगले असून पण कडू वाटतात.. काही शिव्या देतात काही व्यसन करतात.. काही चहा पाजतात काही नेहमी आपल्याच पैशातून चहा पितात.. अशी सगळी लोक्स भेटतात, मित्र होतात, काही कुटुंबातले एक (फॅमिली फ्रेंड) होतात.. काही रिलेटिव्ह होतात.. तर असा सगळं कुटुंब कबिला घेऊन आयुष्यभर जगत असतो..

आता जेवणाचं ताट आणि आयुष्यात येणारे लोक्स यांचा काय संबंध लागतो का ते बघू.. 





रोज जर आपण लोणचं, कोशिंबीर एवढंच खाल्लं तर काय होईल..? किंवा कधी आपण भाजी चपाती वरण भात शिवाय दुसरं काही खाल्लंच नाही तर काय होईल? जेवणात असलेल्या पदार्थ मध्ये मीठच नसेल तर काय होईल? स्वीट डिशचच रोज जेवण केलं तर काय होईल? तर आपल्या पोटाची वाट लागेल.. पोट खराब होईल आणि लवकरच आरोग्य पूर्णपणे बिघडेल.. असच आपल्या आयुष्यात येणारे लोकांचं असत.. भाजी चपाती भात वरण हे मोठे पदार्थ असतात ते आपण जास्त प्रमाणात खातो.. आणि ते जास्त खाल्ले तर आरोग्य वर काही परिणाम घडत नाही.. उलट आरोग्य उत्तम राहत..
चटणी, लोणचं, स्वीट आपण कमी प्रमाणात खातो आणि हे जास्त प्रमाणात खाल्ले तर ऍसिडिटी, पित्त, लठ्ठपणा आणि अजून काय काय होईल सांगता येत नाही..

तर आपलं कुटुंब हे भाजी चपाती भात वरण सारखं असत.. हे रोज ताटात येणारे पदार्थ असतात.. हे पदार्थ नसतील तर ताट अपूर्ण..
लोणचं, कोशिंबीर, गोड पदार्थ हे भेटणारे मित्र असतात.. हे जर ताटात नसतील तर जेवणाला चव येत नाही..
मीठ म्हणजे शिक्षक आणि गुरु.. (मीठ वरून घ्यायचं नसत म्हणतात.. याचा काय संबंध लागतोय का बघा.. :-P  )

तर असं भरलेलं ताट प्रत्येकाकडे असावं आणि पदार्थांचा योग्य प्रमाणात आस्वाद घेतलेला बरा.. नाहीतर चव लागावी म्हणून नुसतं लोणचं आणि चटणीच खात बसलो तर भाजी चपाती चिडतील तसेच नुसतं लोणचं आणि कोशिंबीर खाल्ली तर पित्त होईल किंवा तेलकट लोणचं खोकला येण्याचं निम्मित होईल.. भाजी चपाती आरोग्या साठी चांगली म्हणून नुसते तेच खाल्लं तर तोंडी लावायचे पदार्थ दुर्लक्षित होतील आणि मग आयुष्य बेचव होईल.. तर असं ताट भरून जेवण केलं तर आयुष्य सुंदर आणि आरोग्य उत्तम राहील..

पटलं नाहीतर हलकेच घ्या.. परत एकदा आठवण करून दिली.. :-)

Monday, December 5, 2016

होली काऊ आणि इटालियन चिऊची गोष्ट

एक होती काऊ आणि एक होती चिऊ. 
काउच घर होत तिच्याच शेणाच, चिउच घर होत इटालियन मेणाच. 
एकदा काय झाल कि - मतांचा मोठ्ठा पाउस पडला त्यात शेण कालवून काऊ न तिच्यासाठी टुमदार गोठा बांधला. वासरांच्या गळ्यात घंटा बांधल्या. बैलोबांचि शिंगे रंगवली आणि होली काऊ तिच्या गोठ्यात परिवारासह राहू लागली. त्यात माजलेले वळू होते, उत्साही वासरे होती आणि हंबरणार्या वात्सल्य पुर्ण गायी सुद्धा होत्या. होली काऊ चे प्रेमळ डोळे भरून आले.

मग काय झाल इटालियन चिउचा उन्हाळा सुरु झाला. अंगाची लाही लाही होऊ लागली . तीन डोक्यात राख घालून घेतली होती. त्यामुळे विचार सुचेना. अक्कल चालेना. मग इटालियन चिउताइने काऊ च्या घरी धडक मारली …

चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड .
काऊ : थांब मी माझ्या बाळाला संस्कार करते .

चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड - होलि काऊ … होली काऊ दार उघड..
काऊ : थांब मी माझ्या बाळाला संस्कार करते.

चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड - "नायतर " - मी तुझं घर पाडून टाकते..
काऊ : बर मग ?

चिऊ चिडून चिडून उडुन जाते . गोष्ट संपली .


तात्पर्य : चिमण्या कामाच्या नाहीत . गरुड हवेत .

Saturday, December 3, 2016

नशीब लक तकदीर प्राक्तन..


नशीब लक तकदीर प्राक्तन
या जगात हे शब्द प्रत्येक चांगल्या वाईट घडामोडी माग चिकटलेले आहेत..
माणूस मोठा छोटा होणं सगळं नशिबाशी जोडलेलं आहे आपण..!
माझं नशीबच खराब म्हणून मला ते मिळालं नाही, त्याच नशीब चांगलं म्हणून तो मोठा झाला..
एक मोटिवेशनल वाक्य पण आहे, "बुद्धीवादी लोक नेहमी नशीबवाल्या  कडे काम करताना दिसतात."
 

नशीब खरच असत का?

यश success हि नशिबाशी जोडलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे.. आणि ते काही प्रमाणात खरं पण आहे असं मी समजतो. नाहीतर ७ अब्ज लोकसंख्या असलेल्या जगात सगळ्यांनाच वाटत मला यश मिळावं, माझ्याकडे टोलेजंग घर पाहिजे, लक्झरी गाड्या पाहिजे, घरात १-२ किलो सोन पडून पाहिजे, बँकेत ३-४ करोड बॅलन्स पाहिजे असं स्वप्न सामान्य माणूस आयुष्यात एकदा न एकदा बघतोच, आणि या आशेवर राहतो कि एक न एक दिवस आपण हे सगळं मिळवू, मग जेव्हा प्रत्यक्षात कामाला लागतो तेव्हा एक-एक गोष्टी स्पष्ट होयला लागतात, बंगलाच स्वप्न फ्लॅट वर येत, लक्झरी गाडी च स्वप्न wagnor अल्टो वर येत. बँकेत असलेला बॅलन्स ५ डिजिट च्या पुढं काय जात नसतो.. मग हे करताना जेव्हा कळत कि आपण बघतो ती स्वप्न पूर्ण करायची असतील तर अजून काही तरी वेगळं केलं पाहिजे. इथे कितीही नशीब न मानणारा पण म्हणायला लागतो, आपलं नशीब खराब..! तरी एक आशा असते कि मिळेल.. 





नशिबाला विरुद्धार्थी शब्द हार्ड वर्क आहे.. पण जर खरच ७ अब्ज लोकांनी खूप हार्ड वर्क केला आणि त्यांना सगळ्यांना बँक बॅलन्स, सोन, ५-१० गुंठ्या मध्ये बंगला बांधायचा असेल तर एवढा सौर्स उभा राहील का? तर उत्तर आहे नाही.. ७ अब्ज लोकांना प्रत्येकी ५ गुंठ्या मध्ये जर घर बांधायचं असेल तर अजून एक ग्रह पृथ्वी शेजारी आणून ठेवावा लागल.. आणि बाकी लागणारी साधन तर वेगळीच..

नशीब माणूस जन्माला येतानाच घेऊन येतो हे वाक्य पुढील गोष्टी वरून आपण मानायला हरकत नाही.. माझा जन्म रस्त्यावर राहणाऱ्या भिकाऱ्याच्या घरी झाला असता तर ते माझं नशीबच.. आणि माझा जन्म जर मुकेश अंबानी च्या घरी झाला असता तरी हि ते माझं नशीबच.. इथे आपण असं नाही म्हणून शकत कि हे काय नशिबावर नसत... म्हणजे मी कोणाच्या घरी जन्म घायचा हे नशीबच ठरवत.. हे काही आपल्या हातात नाही.. 

हो पण माझा जन्म भिकाऱ्याच्या घरी झाला तरी मी भिकारी वरून किमान एक ५ आकडी कमावणारा सामान्य माणूस होऊ शकतो हे माझं हार्ड वर्क.. (किमान एवढं तरी प्रत्येकाच्या नशिबात असतंच..!).. म्हणजे कोणताही माणूस ३ वर्ष खूप हार्ड वर्क करून किमान एवढं मिळवू शकतोच ..

या सगळ्या गुंतागुंतीच्या लफड्या पासून लांब राहायचं असल तर आपण एक ठरवू शकतो, मला हार्ड वर्क करून जेवढं काही मिळेल त्यात मी लय खुश आणि समाधानी त्याच्या वर जर काही मला मिळवता आलं तर ते माझं नशीब..!  म्हणजे आता नशीब सुरु कुठून होतं तर हार्ड वर्क नंतर..!
मग मी कुठं पण जन्म घेऊ दे भिकाऱ्या कड किंवा अंबानी कड.. हार्ड वर्क आधी मग नंतर नशीब..!!!

काही गमतीशीर फोटो :-

हे दिसायला जरासे सेम असले तरी यांचं नशीब वेगळं आहे..
 




अब बारी अपनी है.. इनमें नशीब वाला कोण है और हार्ड वर्क वाला कोण है पेहचानने कि..?

Friday, December 2, 2016

चोथा स्तंभ

काल टीव्ही वर बातम्या बघत होतो. एक मराठी चॅनेलवाला कर्नाटकच्या चडचण ला जाऊन बस्ता खरेदी करणाऱ्यांचे बाईट घेत होता. बाईट घेणाऱ्या त्याला जे पाहिजे तेच समोरच्या कडून काढून घेत होता. २०-२५ जणांकडे जाऊन सारखं तेच विचारात होता कि तुम्हाला त्रास होतोय ना नोटबंदीचा? तुम्ही बँकेत जाऊन लाईनमध्ये उभे राहता, तुम्हाला एवढा त्रास होतो, लग्नाचा एवढा मोठा खर्च कसा मॅनेज करता?
लोक्स म्हणायचे काही त्रास नाही, मोदी साहेबांचा निर्णय उत्तम आहे.


चॅनेलवाला म्हणायचा, खरं खरं सांगा, मनापासून सांगा निर्णयामुळे तुम्हाला त्रास झाला ना..? लोक्स म्हणायचे नाही पहिले २ दिवस त्रास झाला पण आता सगळं काही सुरळीत आहे. काही लोकांच्या घरी २-२ लग्न होती त्यांना पण पैशाची चणचण नाही, असे लोकांकडून ऐकून त्याचं तोंड म्हशीच्या योनी वाणी झालं होत. तरी त्याच घोड पुढं दामटत होता. आता त्याला काय करावं कळंना झालं होत. लोक पद्धतशीर मारत होते. 


एवढ्यात अचानकपणे त्याचा चेहरा खुलला, हर्षोल्लीत झाला, गगनात आनंद मावेनासा झाला त्याला जस पाहिजे तसं गिर्हाईक मिळालं. ती एक स्त्री होती, कपाळाला हिंदू स्त्री सारखी टिकली कुंकू नाही, गळ्यात जाड काळे मणी च मंगलसूत्र त्यावरून त्यानी ओळखलं हि आपल्याच कळपातली  आहे. त्यानी केलं सुरु हिंदी मधून (त्याला वाटलं हिच्याशी हिंदी मधून बोललं तर आपली जवळीक आहे असं वाटेल, नशीब मराठी चॅनेल वर उर्दू सुरु केलं नाही). तिला विचारलं, "आपको क्या लगता है, मोदी का डिसिजन अछा है? तुम मुझे बटाओ ये ठीक किया क्या मोदीने?" ती बाया ५ सेकंड विचार करून बोलली अस्सल गावरान मराठीत, "ज्यो निर्णय घेतलाय मोदी सायबा न त्यो लय चांगलं हाय यानी तुमच्या आमच्या पोराबाळांच बघा पुढं लय चांगलं व्हनार आहे." आता चॅनेल वाल्याला काय करावं कळेना.. त्याच्या चेहरा डुक्करापेक्षा घाणेरडा झाला व्हता.. तिथून सटकला आणि दुसरी कड गिर्हाईक शोधाया गेला ४-५ गिर्हाईक उरकली त्यांच्याकडून  पण त्याला जे पाहिजे ते काढून घायचा प्रयत्न करत होता. हाती काही लागलं नाही मग...



अचानक साक्षात ब्रह्मदेव प्रकटवा तसा एक दाढीवाला/टोपीवाला/बिना मुचवाला दिसला आता चॅनेलवालेला वाटलं आता आपल्याला जे पाहिजे ते मिळणार, आपला कलकत्ताला  बसलेला आनंद बाजार साहेब खुश होईल, हिच ब्रेकिंग न्यूस दाखवायची असे किडे डोक्यात सुरु झाले असणार.. मला पण २ से. वाटलं आता हा जिंकला.. त्यानी सुरु केलं, "भाईसाहब, आपको क्या लागत है? क्या फैसला गलत है या नही?" दाढीवाला जे काही म्हणाला ते ऐकून मला खरच त्याच कौतुक वाटलं. तो म्हणाला, "ये जो फैसला है उसका असर हमपे नाही बल्की काला पैसे जिंके पास है उनको पडेगा, इससे आचछा निर्णय अबसे पहिले कभी नाही हुआ.." आता चॅनेलवाल्याला हे सांगावंच लागलं कि नोटबंदी मुळे कुठंच कसल्या प्रकारचा त्रास होत नाही ये, सगळं काही सुरळीत चालू आहे, विरोधी पक्ष लोकांना त्रास होतोय असं सांगत आहेत त्याचा जरा सुद्धा मागमूस बाजारात दिसत नाहीये..

जाता जाता त्यानी गर्दी मध्ये घुसुन विचारलं, देशात आता जर निवडणूक झाल्या तर कोणाला मत द्याल..? एका सुरात सगळे उपस्थित म्हणाले मोदी ला ...!!


चॅनेलवाल्याची लोकांनी जिरवली याचा आनंद..